नवी दिल्ली – विकासासाठी सुरक्षित वातावरण नितांत आवश्यक असते. राष्ट्रीय सुरक्षेप्रति आपण कायम दक्ष राहायला हवे, असे उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे. उपराष्ट्रपतींनी आज आंध्र प्रदेशातल्या विशाखापट्टणम इथे “सोसायटी फॉर ऍप्लाइड माइक्रोवेव इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग ऍण्ड रिसर्च (समीर)च्या दोन युनिटना भेट दिली. मानव अथवा निसर्गनिर्मिती इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पंदनांमुळे (इएमपी) भौगोलिक क्षेत्र प्रभावित होण्याची शक्यता असते.
राष्ट्रीय सुरक्षा आणि आर्थिक समृद्धीच्या दृष्टीने महत्वाच्या घटकांना याचा फटका बसण्याची, जागतिक स्तरावर वाणिज्य आणि स्थैर्य यांवर परिणाम करण्याची ताकद त्यात असते. या पार्श्वभूमीवर इएमपी रोधक पायाभूत सुविधा आणि संरक्षणा यंत्रणा विकसित करण्याची गरज उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली.