पुणे – दहशत पसरवण्याच्या उद्देशाने बिबवेवाडीतील सरगम चाळ येथे टोळक्याने वाहनांची तोडफोड केली. यानंतर नागरिकांना कोयते आणि बांबुचा धाक दाखवत आम्ही इथले भाई आहोता, एकालाही जीवंत सोडणार नाही असे म्हणत दहशत माजवली. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात आठ ते नऊ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी काशीनाथ निंगदळे (42,रा. अपर बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार चैत्रबन वसाहत,अप्पर डेपोकडे जाणा-या रोडचे कडेला व सरगम चाळ,,अप्पर बिबवेवाडी येथे आरोपींनी त्यांचे हातामध्ये लोखंडी कोयता व लाकडी बांबु घेवुन दहशथ माजवली.
यानंतर चैत्रबन वसाहत,अप्पर डेपोकडे जाणा-या रोडचे कडेला उभ्या असलेल्या फिर्यादीच्या तीनचाकी पॅगो टेम्पोची समोरील बाजुची काच,तसेच वस्तीतील परमेश्वर दसाडे यांचा चारचाकी टेम्पो व किरण सोनकांबळे यांचा चारचाकी टेम्पो या दोन टेम्पोच्या समोरील बाजुचे काचेवर कोयत्याने मारून नुकसान केले.
तसेच लोखंडी कोयता व बांबुचा धाक दाखवत,आम्ही इथले भाई आहे,हा आमचा एरीया आहे, मध्ये कोण पडल्यावर एका-एकाला जिवंत सोडणार नाय अशी धमकी देवुन दहशत माजवली. तेथुन पुढे पवननगर,शनि मंदिरा जवळ उभ्या असलेल्या दिपक पवार व आनंद शिंगे यांचे रिक्षाचे काचेवर, संदेश पटेल यांचे दुचाकीचे मागील लाईटचे बाजुवर व ओमकार भोसले यांचे कारचे पाठीमागील काचेवर कोयत्याने वार करुन एकुण 29 हजार रुपयाचे नुकसान केले. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रविण काळोखे करत आहेत.