नवी दिल्ली – उत्तरकाशी बोगदा (uttarkashi tunnel) दुर्घटनेत १७ व्या दिवशी मोठे यश मिळाले आहे. बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांना सुखरूप बाहेर काढण्याचे काम अखेरच्या टप्प्यात आले आहे. मंगळवारी बोगद्याला भगदाड पाडण्यात आले असून एस्केप बोगद्यातून कामगारांना बाहेर काढण्यासाठी एस्केप टनेल बांधण्यात आला आहे.ज्याद्वारे सुरुवातीच्या टप्प्यात 15 कामगारांना बाहेर काढण्यात येईल. (Tunnel Rescue opration)
चारधाम ऑल वेदर प्रोजेक्ट (Uttarkashi Tunnel Rescue) च्या सिल्कियारा बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांचे प्राण वाचवण्याचे बचाव कार्य आज यशस्वी झाले. उत्तरकाशी बोगदा दुर्घटनेत १७ व्या दिवशी मोठे यश मिळाले आहे. बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांना सुखरूप बाहेर काढण्याचे काम अखेरच्या टप्प्यात आले आहे.
#WATCH | Garlands brought to Silkyara tunnel rescue site in anticipation of early rescue of 41 trapped workers#Uttarakhand pic.twitter.com/71opSj1sKt
— ANI (@ANI) November 28, 2023
बचाव पथकाला ५७ मीटर अंतरावर यश मिळाल्याचे सांगण्यात आले. डॉक्टरांचे पथक मुख्य बोगद्याच्या आत कामगारांच्या आरोग्याची तपासणी करत आहे. केंद्रीय राज्यमंत्री व्हीके सिंह आणि मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांची कामगारांशी बातचीत देखील केली.
#WATCH | Family members of the trapped workers who are expected to be rescued soon from the Silkyara tunnel in Uttarkashi say, “We are happy that they will be rescued soon. We will welcome them in a nice way. We had told them that the rescue team would reach them soon.” pic.twitter.com/sRmEz5Dp64
— ANI (@ANI) November 28, 2023
सीएम धामी बोगद्याच्या आत पोहोचले
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी सिल्कियारा बोगद्याच्या आत पोहोचले आहेत. आता बोगद्यात अडकलेल्या इतर कामगारांना कोणत्याही क्षणी रुग्णवाहिकेद्वारे बाहेर काढले जाऊ शकते.