पालघर – मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वसई शहरात बुधवारी झालेल्या भूस्खलनात एकाच कुटुंबातील दोन जण ठार झाले तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले. ठारे झालेले दोघे वडिल आणि मुलगी आहेत. स्थानिक अग्निशमन दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल च्या पथकाने घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले.
भूस्खलनानंतर पहाटे 6.30 च्या सुमारास वसईतील राजावली भागातील वाघरलपाडा येथील स्थानिक रहिवासी अनिल सिंग यांच्या घरावर डोंगरावरील दरड कोसळली. त्यात अनिल सिंग (वय वय 45), आणि त्यांची कन्या रोशनी सिंग (वय 16) हे दोघे ठार झाले. त्यांची पत्नी वंदना आणि मुलगा ओम हे ढिगाऱ्याखाली अडकले. त्यांना स्थानिक लोकांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढून रूग्णालयात दाखल केले.
जिल्ह्यात मंगळवारी रात्रीपासून जोरदार पाऊस पडत असून त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे. पालघरमधील मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या एका भागात बुधवारी काही झाडे उन्मळून पडली, जिथे पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू होते त्या कामात मोठा अडथळा निर्माण झाला आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.