मुंबई – शिवसेना भाजपपासून (shivsena bjp) दूर गेल्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार (MVA) स्थापन झाले. मात्र कोरोना काळ संपताच एकनाथ शिंदेंनी (cm eknath shinde) उद्धव ठाकरेंची साथ सोडून भाजपसोबत हात मिळवणी केली. त्यानंतर शिंदे भाजप सरकार सत्तेवर आले. दरम्यानच्या काळात राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. अशात आता 2021 मध्ये उद्धव ठाकरे हे भाजपसोबत युती करण्याच्या विचारात होते असा खळबळजनक दावा अजित पवार गटाच्या नेत्याने केला आहे.
2021 मध्ये पंतप्रधान मोदींशी चर्चा झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पुन्हा एकदा भाजपसोबत (bjp) युती करण्याच्या विचारात होते असा दावा शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी केला आहे. तसेच ठाकरे भाजपसोबत युती करणार असल्याच्या विचारात आहेत असं त्यावेळी खासदार संजय राऊत यांनी म्हंटल होत असंही तटकरे यांनी सांगितलं. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त प्रसारित केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm modi) यांची भेट घेतल्यानंतर जूनमध्ये अजित पवार (Ajit Pawar) आणि अशोक चव्हाण (Ashok Chavhan) यांच्यासमोर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ही बाब सांगितल्याचे सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. तटकरे म्हणाले,”सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांच्या या बैठकीत संजय राऊत देखील सोबत होते. राऊत यांनी आम्हाला सांगितले की उद्धव ठाकरे यांचे मन बदलले आहे आणि ते भाजपामध्ये परतण्याचा विचार करीत आहेत.
सुनील तटकरे पुढे म्हणाले,”ही बैठक दिल्ली दौऱ्यानंतर 15 दिवसानंतर झाली होती. तसेच त्यानंतर शिंदे आणि नार्वेकर यांनी राऊत यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रीया दिली होती, परंतू त्याबाबत आपण काही बोलणार नसल्याचे त्यांनी सांगितले.” एका मराठी वृत्तवाहिनीने देखील याबाबतची माहिती प्रसारित केली आहे.