Udayanraje Bhosale । Satara Loksabha । सातारा लोकसभेच्या निवडणुकीतून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी माघार घेतली.त्यामुळे या जागेवर आता नवा पेच निंर्माण झालाय. तर दुसरीकडे महायुतीकडून देखील उदयनराजे यांच्या उमेदवारीची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. उदयनराजेंना भाजपकडून उमेदवारी निश्चित असली, तरी जाहीर होण्याची वाट न बघता त्यांनी प्रचाराचा धडाका सुरू केला आहे.
त्यांनी काल महाबळेश्वर, पाचगणीचा दौरा केल्यानंतर आज सुद्धा भेटीगाठींचा सिलसिला सुरुच ठेवला असून लोकांशी संवाद साधत आहेत. त्यांनी स्वतः आपल्या प्रचाराच्या काही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. । Udayanraje Bhosale
साताऱ्यातील ऐतिहासिक शाही मस्जिद येथे सर्व मुस्लिम बांधवांना भेटून पवित्र रमजान सणाच्या शुभेच्छा दिल्या.#संवाद_दौरा pic.twitter.com/cBdfJ5ZRYk
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) April 5, 2024
उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातील ऐतिहासिक शाही मस्जिद येथे सर्व मुस्लिम बांधवांना भेटून पवित्र रमजान सणाच्या शुभेच्छा दिल्या. मशिदीत जाऊन मुस्लिम बांधवांची राजे यांनी भेट घेतली. यावेळी मुस्लिम बांधवांकडून उदयनराजे यांचा सत्कार करण्यात आला. उदयनराजे यांनी यांनी मुस्लिम समाजाशी संवाद साधला. । Udayanraje Bhosale
दरम्यान, यावेळी बोलताना उदयनराजे भोसले यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. “आजपर्यंत कधीही राजकारण केलं नसून संपूर्ण समाजकारण. लोकहिताची कामे केली आहेत. कोणाला दुखवलं नाही, लोकांचे प्रेम असल्याने लोक ठरवतील काय करायचे ते. इथं आत गेल्यानंतर सगळे पक्षी बघितले. बाकी मला काही माहिती नाही..’ असं ते यावेळी म्हणाले.
2019 मध्ये सातारा लोकसभेला काय घडलं होतं? । Udayanraje Bhosale
2019 लोकसभेला शिवसेनेच्या नरेंद्र पाटील यांचा उदयनराजे भोसले यांनी एक लाख 26 हजाराच्या मताने पराभव केला होता. मात्र, निवडणुकीनंतर राष्ट्रवादीला सोडचिट्टी देत उदयनराजे भाजपमध्ये गेले. साताऱ्याची पोटनिवडणूक झाली तेव्हा विधानसभेची निवडणूक होती.
त्यावेळी महाराष्ट्रभर शरद पवारांचा झंझावात सुरू होता. या कालावधीमध्ये ऐतिहासिक पावसाची सभा साताऱ्यामध्ये झाली होती. पाटणची सभा पार पडल्यानंतर शरद पवार साताऱ्यामध्ये येत होते. परंतु, विजांच्या कडकडाटासह पावसाने लोक जायला निघाले, तरी शरद पवार प्रचंड पाऊस अंगावर घेत व्यासपीठावर आले होते.
निवास पाटील त्यांच्यासोबत होते. रामराजे निंबाळकरही त्यांच्यासोबत होते. शरद पवार यांनी त्यावेळी “मी यापूर्वी चूक केली, ती चूक दुरुस्त करा असा नारा दिला..’ त्या सभेनं मोठं परिवर्तन महाराष्ट्रामध्ये झालं. उदयनराजे 1 लाख 26 हजार मतांनी निवडून आले होते, तेच उदयनराजे सहा महिन्यांनी 86 हजार मतांनी पराभूत झाले. । Udayanraje Bhosale