सुलतानपूर (यूपी) – उत्तरप्रदेशातील एका गावात हल्लेखोरांनी दोन शेतकऱ्यांची गोळ्या झाडून हत्या करण्याचा प्रकार घडला आहे. अखंड नगर पोलीस स्टेशन हद्दीतील मारुई कृष्णदासपूर गावात हे शेतकरी त्यांच्या शेतजमिनीवर काम करत असताना सोमवारी रात्री ही घटना घडली. धर्मराज मौर्य (60) आणि विजय कुमार राजभर (45) अशी मृतांची नावे आहेत.
जुन्या वैमनस्यातून ही हत्या घडवून आणली असावी असा पोलिसांचा कयासस आहे. शेतात जखमी अवस्थेत पडलेल्या या शेतकऱ्यांना शासकीय आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. पण ते यापुर्वीच मरण पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांनी त्याच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक स्थापन केले आहे. या प्रकारामुळे परिसरात काहीसा तणाव निर्माण झाला आहे.