नवी दिल्ली – सार्वजनिक क्षेत्रातील एअर इंडिया कंपनी डिसेंबर अखेर टाटा समूहाला हस्तांतरित करण्यात येणार होती. मात्र या संदर्भातील काही औपचारिक बाबी पूर्ण करण्यास वेळ लागणार असल्यामुळे आता हे हस्तांतरण लांबणीवर पडले आहे.
यासाठी किमान एक महिन्याचा तरी वेळ लागेल असे सांगण्यात आले. जानेवारी अखेरीस हे हस्तांतरण पूर्ण होईल असे वातावरण आहे. एअर इंडिया कंपनी खरेदीसाठी टाटा सन्स कंपनीने बोललेली निविदा ऑक्टोबर महिन्यात सरकारने स्वीकारली आहे. त्यावेळी ही प्रक्रिया डिसेंबरअखेर पूर्ण होईल असे नियोजन करण्यात आले होते. मात्र आता यासाठी जानेवारी अखेरपर्यंत वेळ लागणार आहे.
या व्यवहाराला स्पर्धा आयोगाने गेल्याच आठवड्यात मान्यता दिली आहे. भाग भांडवल हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र तरीही आणखी काही कागदपत्रांची पूर्तता करणे बाकी असल्याचे सांगण्यात आले.