नवी दिल्ली – झारखंडमधील चितारपूर (Jharkhand news) गावाजवळ ट्रक आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात सहा वर्षांच्या चिमुकल्यासह एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, तर तीन वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली आहे. (Accidnet)
ही दुर्घटना रांचीपासून ९० किमी अंतरावर असलेल्या चितारपूर गावाजवळ दुपारी ४ वाजता घडली.विजय गंझू (28), देवंती देवी (26) आणि अमृत कुमार (सहा) अशी मृतांची नावे आहेत. बालुमठ पोलीस ठाण्याचे प्रभारी धर्मेंद्र कुमार महतो म्हणाले.
एका कुटुंबातील चार जण मोटारसायकलवरून जात असताना त्यांना बालुमठ-चंद्र रस्त्यावर ट्रकने धडक दिली. यात पती–पत्नीसह त्यांचा मुलगा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तिला रांची येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, ट्रक जप्त करण्यात आला असून चालक आणि मदतनीस यांना अटक करण्यात आली आहे.