नगर – छत्रपती संभाजी महाराज यांनी घालून दिलेल्या आदर्शप्रमाणे पुन्हा एकदा वागावे लागेल. करोनासारख्या महामारीच्या आपत्तीत देशसेवा कशी करावी, हे त्यातून समजेल, असे विचार आमदार संग्राम जगताप यांनी स्पष्ट केले. देशात सध्या रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. तो भरून काढण्यासाठी तरुणांना पुढाकार घ्यावा लागेल, असेही ते म्हणाले.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या 363 व्या जयंतीनिमित्त येथील आदर्श मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन करताना ते बोलत होते. शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर पाटील, माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर, विद्यार्थी परिषदेचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र भांडवलकर यांच्यासह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा नगर शहरात नाही, ही अतिशय खेदाची बाब आहे. प्रोफेसर कॉलनी चौकातील नियोजित जागेत छत्रपती संभाजी राजांचा पुतळा स्थापित करण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन संजीव भोर यांनी यावेळी केले. स्मिलींग अस्मिता कष्टकरी शेतकरी संघटनेचे यशवंत तोडमल, प्रशांत सराईकर, तुषार सूर्यवंशी, शिवजीत डोके, प्रताप मारवडे, स्वप्निल फुंदे, मनोज भोसले, अक्षय चिंतामणी, राहुल दरेकर, अमित कचरे, नरेंद्र म्हस्के, शिवम देवगणे, धनराज सोनवणे, उमेश पाठक, पवन कंठाळे, विवेक पालवे आदींनी शिबीर यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. प्रास्ताविक अतुल चौधरी यांनी केले. आदर्श मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष विशाल म्हस्के यांनी आभार मानले.