चेन्नई -जी-20 परिषदेच्या डिनर कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रात ‘भारताचे राष्ट्रपती’ असे लिहिल्यानंतर त्याबाबत परस्परविरोधी प्रतिक्रिया येत आहेत. यावरून विरोधी पक्षांनी सरकारवर निशाणा साधला आहे. दरम्यान, उदयनिधी यांच्या वक्तव्यावरून आधीच वादात सापडलेले तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.
त्यांनी मायक्रो-ब्लॉगिंग साइट एक्सवरील पोस्टमध्ये लिहिले आहे की भाजपने भारत बदलण्याचे आश्वासन दिले होते, परंतु सरकार केवळ नाव बदलण्यात मग्न आहे. द्रमुकचे अध्यक्ष आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी मंगळवारी आरोप केला की, भाजपला “इंडिया’चे भारतात रूपांतर करायचे आहे. विरोधी गटाच्या नावातील ‘इंडिया’ या शब्दाने भगवा पक्ष घाबरला आहे, असाच त्याचा अर्थ आहे.
स्टॅलिन यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, बिगर-भाजप शक्ती एकत्र येऊन फॅसिस्ट भाजपची राजवट उलथून टाकल्यानंतर आता भाजपला ‘इम्डिया’ हे नाव खुपू लागले आहे. त्यामुळे त्यांना देशाचे नाव बदलण्यात रस आहे. भाजपला ‘इंडिया’ या एकाच शब्दाची भीती वाटते कारण ते विरोधकांमधील एकतेची ताकद ओळखतात. निवडणुकीच्या काळात ‘इंडिया’ आघाडी भाजपला सत्तेतून बेदखल करेल, याची खात्री खुद्द भाजपच्या लोकांना समजली आहे.