मुंबई – २६ खासदार असलेल्या गुजरातमधील व्यक्ती पंतप्रधान होते, तर ४८ खासदार असलेल्या महाराष्ट्रातून पंतप्रधान का होऊ शकत नाही, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले होते. याला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले असून, साडेतीन जिल्ह्याच्या नेत्याशी पंतप्रधान मोदींची तुलना नको, असा पलटवार राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे भाजप पक्षावर केला आहे. यावर आता भाजपचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत प्रतिउत्तर दिल आहे.
भाजपचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर साडेतीन जिल्ह्याच्या नेत्याशी मोदींची तुलना नको असा म्हणत अमोल कोल्हेंवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले,’ “फरक आहे… पराभवाच्या भीतीने शरद पवार यांनी माढा मतदार संघातून माघार घेतली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून निवडून आले. त्यामुळे साडेतीन जिल्ह्याच्या नेत्याशी मोदींची तुलना नको.” असं ट्विट अतुल भातखळकर यांनी केलेलं आहे.