नवी दिल्ली: आरोग्य मंत्रालय, कृषी मंत्रालय, गृह मंत्रालय आणि आयसीएमआर यांनी सोमवारी देशातील कोरोना विषाणूशी संबंधित नवीन तथ्य आणि आकडेवारी सादर केली. आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, गेल्या 24 तासांत 1553 नवीन रुग्ण आढळले आहेत आणि या कालावधीत 36 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात एकूण 17,262 घटना घडल्या आहेत.
दरम्यान, चांगली बातमी अशी होती की देशातील अनेक जिल्हे आता कोरोना मुक्त झाले आहेत.देशातील 59 जिल्ह्यात 14 दिवसात एकही कोरोना प्रकरणआढळले नाही. परंतु ही चिंतेची बाब आहे की आतापर्यंत नोंदविलेली 80 टक्के प्रकरणे अशी आहेत, ज्यामध्ये कोणतीही लक्षणे दिसली नाहीत.
तसेच मुंबईतील काही पत्रकारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती केंद्राने दिली. दरम्यान पत्रकारांनी योग्य काळजी घेण्याचे सरकारने सांगितले.