मुंबइ- राज्याच्या सत्तासंघर्षावर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. यापार्श्वभूमीवर पुन्हा आपले सरकार येईल, असा दावा कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत त्यांनी आपली भूमिका मांडली.
आपण एकत्र राहिलो तर विधानसभेत 180 आमदार निवडून येतील. सगळे एकत्र राहिलो तर त्याचा त्रास होईल, पण समन्वय साधला सगळ्यांना सांभाळून घेतले तर आपले सरकार नक्की येईल, असे थोरातांनी मविआच्या नेत्यांना उद्देशून म्हटले आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या नेत्यांची दुपारी बैठक पार पडली. या बैठकीत ठाकरेंच्या शिवसेनेतील नेते, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी शिंदे व सरकारच्या अनेक योजनांवर सडकून जोरदार टीका केली.