आळंदी – करोनाच्या महामारीमुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्याने तब्बल साडेतीन महिन्यांपासून रिक्षांची चाके एकाच जागेवर रूतून बसल्याने घर प्रपंच कसा चालवायचा? असा सवाल आळंदी परिसरातील रिक्षाचाकांनी उपस्थित केला आहे.
लॉकडाऊनमुळे रिक्षा जागेवरच उभी असल्याने रिक्षाची हप्ते कसे भरायचे? आर. टी.ओ.ची देणी कशी द्यायची? अशी चारही बाजूने कमकुवत झालेली आर्थिक बाजू यातून कुटुंबाला व स्वतःला कसे सावरायचे ? यापुढील जीवन कसे जगायचे? हा प्रश्न आता खऱ्या अर्थाने रिक्षाचालकांसाठी अनुत्तरीतच राहील काय असा प्रश्न शेकडो रिक्षाचालकांना पडला आहे.
या तीन ते साडेतीन महिन्यांत मोठे आर्थिक नुकसान झाले आहे, त्यामुळे शासकीय अनुदान अथवा मदत देण्यात यावी अशी मागणी आळंदीतील रिक्षाचालक संघटनेकडून शासनाकडे केली जात आहे. याबाबत माजी नगरसेवक तथा संत ज्ञानेश्वर महाराज प्रवासी संघटनेचे सर्वेसर्वा किसन महाराज तापकीर म्हणाले की, सर्व रिक्षाचालक मालकांसाठी शासनाकडून जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.