नवी दिल्ली : देशातील लॉकडाऊन संपल्यानंतर म्हणजे 15 एप्रिलपासून रेल्वे सेवा सुरू करण्याबाबत रेल्वे मंत्रालयाकडून अद्याप कोणतीही सुचना आली नाही. या स्थितीत प्रवासी वाहतूक कधी सुरू होईल, हे सांगता येत नाही. प्रवासी वाहतूक पूर्ववत करण्याचा निर्णय झाल्यानंतर त्याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात येईल, असे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे रेल्वेसेवा लॉकडाऊन नंतर तातडीने सुरू होण्याची आशा मावळली आहे.