मुंबई – ‘करोना’ या तीन अक्षरी शब्दांनी गेल्या तीन वर्षांपूर्वी जगभरात मोठा धुमाकुळ घातला होता. जगात करोनाची कोट्यावधी लोकांना लागण झाली. तर करोनामुळे जगभरात लाखो लोकांचा मृत्यू झाल्याचं आपण पाहिलं आहे. दरम्यान, अश्यातच आता करोनाने पुन्हा एकदा आपलं डोकं वर काढलं आहे. त्यामुळे सगळीकडे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
देभरात झपाटय़ाने वाढणाऱया ‘एच3एन2’ने इन्फ्लुएन्झा टेन्शन वाढवलेले असताना आता पुणे शहरात करोना रुग्णांची संख्याही वेगाने वाढत आहे. त्यामुळे आता पुणेकरांचं टेन्शन वाढलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात करोनाच्या 1700 पेक्षा जास्त रूग्णांची नोंद झाली आहे. भारतात सक्रिय रूग्णांची संख्या आता 7927 वर पोहोचली आहे.
दरम्यान राज्यात मागील 24 तासात 343 रुग्ण आढळून आले आहेत. सर्वाधिक रुग्ण हे पुणे शहरातील असून पुण्यात 510 रुग्णांची नोंद झाली असून नवे 136 रूग्ण आढळले आहेत. राज्यात तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात एकूण 1700 सक्रिय रुग्ण आढळले आहेत. तर देशात आत्ता पर्यंत 98.79 टक्के लोक करोनामधून बरे झाले आहेत. तर, दुसरीकडे नागरिकांना काळजी घेण्याचे देखील आव्हान देखील आरोग्य विभागाने केलं आहे.
बाहेर फिरताना काळजी घ्या, शक्यतो मास्क लावूनच फिरा किंवा ज्यांना खोकला असेल अशा रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी, असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या दिवसांपूर्वीच केलं आहे. विधान भवन येथे एच3एन2 आजारा विषयीची आरोग्य अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली होती. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांनी देखील या नियमांचं पालन करून आपल्या स्वतःची आणि इतरांची काळजी घेणे महत्वाचे आहे.