पिरंगुट – जुलै महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात अतिवृष्टीने मुळशी तालुक्याला चांगलाच दणका दिला. मात्र, त्यानंतवर आता ऑगस्ट संपत आला तरीही मोठ्या पावसाची शक्यता दिसून येत नसल्याने येथील भातशेती करणारे शेतकरी चिंतेत आहेत.
आधीच अतिवृष्टीने भातशेतीचे नुकसान झाले आहे आणि आता पाऊसच नसल्याने भाताचे उत्पन्न घटणार असल्याने शेतकऱ्यांना दुहेरी संकटाला सामोरे जावे लागणार असल्याचे चिन्हे दिसून येत आहेत.