मुंबई – ‘द केरळ स्टोरी’ सिनेमावरून देशभर वाद सुरू आहे. भाजपा शासित राज्यात हा सिनेमा ‘टॅक्स फ्री’ करण्यात येत आहे. तर, दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये या सिनेमावर बंदी घालण्यात आली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ‘द केरला स्टोरी’ सिनेमाबद्दल खळबळजनक वक्तव्य केले आहे. ”सिनेमा निर्मात्याला फासावर लटकावले पाहिजे”, असे जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी म्हटले आहे.
‘द केरळ स्टोरी’ सिनेमाच्या नावाखाली एका राज्याची आणि तेथील महिलांची बदनामी करण्यात आली. अधिकृत आकडा 3 महिलांचा आहे, सिनेमात 32 हजार दाखवण्यात आलं आहे. ज्याने या सिनेमाची निर्मिती केली आहे, त्याला सर्वाजनिकरित्या फासावर लटकवले पाहिजे, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
Under the name of ‘The Kerala Story’, a state and its women were defamed. The official figure of three was projected as 32,000. The person who produced this fictional movie should be hanged in public: NCP leader Dr Jitendra Awhad pic.twitter.com/W4kQuZQEl5
— ANI (@ANI) May 9, 2023
‘केरळच्या नावाने प्रदर्शित झालेला सिनेमा हा खोटारडेपणाच्या परमोच्च स्थानावर आहे. केरळची सत्य परिस्थिती वेगळी आहे. विदेशातून भारतात येणारा जो पैसा आहे, त्याच्यातील 36 टक्के पैसा हा केरळचे नागरिक पाठवत आहेत. गेल्यावर्षी त्यांनी 2.36 लाख कोटी रुपये पाठवले होते. केरळचा साक्षरतेचा दर 96 टक्के आहे, भारत देशाचा 76 टक्के आहे.
केरळमध्ये दारिद्र्य रेषेखाली राहणाऱ्या नागरिकांची संख्या 0.76 टक्के इतकी आहे. देशातील दारिद्र्य रेषेखालील नागरिकांची संख्या 22 टक्के आहे. बालमृत्यूचे प्रमाण केरळमध्ये 6 टक्के आहे. आसाममध्ये 42 टक्के तर, उत्तरप्रदेशमध्ये 46 टक्के आहे. केरळचे दरडोई उत्पन्न हे भारताच्या 7 टक्के अधिक आहे, अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.