मुंबई – कोल्हापूर पोटनिवडणुकीत स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लक्ष घातलं होतं. काही झालं तरी यश आम्हाला मिळणार आशा प्रकारचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला गेला असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.
कॉंग्रेस उमेदवाराच्या विजयाच्या पार्श्वभूमीवर बोलताना पवार म्हणाले की, काही वेगळे विषय घेऊन जाणीवपूर्वक समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. त्यातून मते मिळतात की काय असा ही प्रयत्न झाला. पण शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात त्याला थारा मिळला नाही. अतिशय चांगल्या मताधिक्याने जाधव ताई निवडून आल्या.
त्यांचे अभिनंदन. हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी चांगले श्रम घेतले. एकोप्याने ठेवण्याचे काम केले, असे अजित पवारांनी म्हटले आहे.