जामखेड -जामखेड तालुक्यातील दिघोळ आणि परिसरातील गावांची विजेची समस्या लक्षात घेऊन तिथे नवीन वीज उपकेंद्र उभारण्यात यावे यासाठी आमदार रोहित पवार यांनी विशेष प्रयत्न केले. शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा करून दिघोळ येथे नव्याने 33/11 वीज उपकेंद्राला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आ.पवार यांनी सोडविला आहे.
जामखेड तालुक्यातील दिघोळ, जातेगाव, जायभायवाडी, तेलंगशी, धामणगाव, माळेवाडी येथील शेतकऱ्यांच्या वीज पंपांना, गावातील घरगुती व इतर ग्राहकांना खर्डा येथील 33/11 वीज उपकेंद्रातून वीज पुरवठा केला जातो. परंतु उपकेंद्रापासून ही गावे 25 ते 30 किलोमीटर दूर असल्याने पुरेशा दाबाने व व्यवस्थित वीज पुरवठा होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर दिघोळ येथे नवीन उपकेंद्र उभारल्यास या सर्व समस्या दूर होतील.
या अनुषंगाने आ. रोहित पवार यांनी नव्या उपकेंद्रास मान्यता मिळण्यासाठी मोठे प्रयत्न केले. त्यातून आता नवे वीज उपकेंद्र दिघोळ येथे मंजूर झाले आहे. ज्यामुळे परिसरात अखंडित व उच्च दाबाने वीज पुरवठा होणार असून येथील शेतकऱ्यांच्या विजेच्या संदर्भातील अडचणी दूर होणार आहेत. यासोबतच खर्डा उपकेंद्रावर अवलंबून असलेल्या खर्डा, सातेफळ, लोणी, वाकी ा गावांना फायदा होणार आहे.
राशीनच्याही उपकेंद्राची क्षमता वाढवून 20 केव्ही
राशीन येथील उपकेंद्रावर येणारा ताण लक्षात घेता त्याची देखील क्षमता वाढविण्यात येणार आहे. त्यानुसार आता राशीन येथील उपकेंद्राची पूर्वी असणारी 15 के.व्हीची क्षमता 5 के.व्हीने वाढवून ती 20 के.व्ही करण्यात येणार आहे. त्यामुळे परिसरात विजेचा होणारा लपंडाव कायमचा बंद होणार आहे. तसेच कर्जत तालुक्यातील राशीन येथील 33/11 वीज उपकेंद्रावर अवलंबून असलेल्या चीलवडी, परीटवाडी, तळवडी येथील फिडरवर येणारा ताण आता क्षमता वाढल्याने कमी होणार आहे.