वाघोली (पुणे) – आनंदी व सुखी जीवन जगण्यासाठी साईवाणीचा जरूर उपयोग करून घ्यावा, असे आवाहन ऍड. डॉ. सुनील करपे यांनी केले आहे.
जीवन जगण्याची कला शिकवणारी एक जीवनाभिमुख अशी जीवन पद्धतीबाबत अनोखा कार्यक्रम व संवाद साईवाणी ऍड. डॉ. सुनील नानासाहेब करपे लिखित व प्रकाशित 108 पुस्तके व साई वाणी कार्यक्रमास पुणे येथून सुरुवात झाली आहे. यामध्ये साईबाबांच्या चरित्रामधून प्रेरित होऊन ऍड. डॉ. सुनील करपे यांनी जीवनामधील विविध विषयांना व समस्यांना स्पर्श करून आपल्या सुश्राव्य व अतिशय मार्मिक अशा प्रवचनांमधून जीवन जगण्याची कला हा कार्यक्रम दररोज सकाळी सात ते नऊ व संध्याकाळी सहा ते नऊ या वेळात विविध ठिकाणी करण्यास सुरुवात केली आहे.
ही कला लोकांना खूप काही शिकवत आहेत. त्यामध्ये करपे यांनी सुमारे 108 पुस्तके लिहून प्रकाशित केली आहेत. पुस्तकांची नावे व विषय पुढीलप्रमाणे – पथ की खोज, उंची उडान, मन के उस पार, एक एक कदम, जीवन क्रांती के सूत्र, जीवन एक खोज, योग का महत्व, जीवन गीत, भारतभ्रमण, कृषी भूमी भारत, अहंकार प्रेम क्या है, गांधीजी के पथ पर, दिव्य संदेश, लोभ, असली इन्सान, आत्म पूजा. या विषयांना करपे यांनी संपूर्ण भारतामध्ये साईवाणी या अनोख्या जीवन जगण्याची कला शिकवण्याच्या विषयाच्या संवाद मालेला सुरुवात केली आहे. मेडिटेशन प्रवचन आणि प्रश्नोत्तरे याप्रकारे कार्यक्रमाची रूपरेखा आहे.
अतिशय मार्मिकपणे आपले चिंतन ऍड. डॉ. करपे यामध्ये करीत आहेत. पुणे येथे त्यांनी विविध ठिकाणी आपले साई वाणी केंद्र सुरू केले आहे. त्या माध्यमातून श्री लक्ष्मी नारायणी ट्रस्टचे संस्थापक मा. गुरुबंधू प्रवीणजी राऊत यांच्या अध्यात्मिक मार्गदर्शनाखाली कार्य करत आहेत. वाघोली येथे इंग्रजी माध्यमाची शाळा श्री लक्ष्मीनारायण इंटरनॅशनल स्कूल व श्री लक्ष्मी नारायणी ट्रस्टचे हॉस्पिटल स्थापन करण्यात आले आहे. समाजामध्ये एकोपा निर्माण होऊन श्रद्धा आणि सबुरी या तत्त्वाने व जीवनाची गुरुकिल्ली यासाठी डॉ. करपे कार्य करीत आहेत. त्या माध्यमातून साई वाणी मासिक सुरू केले आहे.