मुंबई – उत्तर आणि दक्षिण भारतात काही दिवसांपासून मान्सूनच्या पावसाने थैमान घातले आहे. निम्म्याहून अधिक देशातून मान्सून परतला असला तरी अद्यापही काही राज्यांमध्ये मान्सूनचा मुक्काम वाढला आहे. यामुळे पुढील काही दिवस दक्षिण भारत आणि ईशान्यकडील राज्यात मान्सूनच्या सरी कोसळणार आहेत.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील आठवड्यात म्हणजेच 26 ऑक्टोबर रोजी संपूर्ण देशातून मान्सून वापसी होणार आहे. 1975 नंतर देशात पहिल्यांच इतके दिवस मान्सून थांबला आहे. वायव्य भारतातून मान्सूनने निरोप घेतल्यानंतरही, काही राज्यात अद्याप नैऋत्य मोसमी वारे सक्रिय आहेत. यावर्षी 6 ऑक्टोबर रोजी राजस्थानमधून मान्सूनने परतीच्या प्रवासाला सुरुवात केली होती.
पण दरम्यान अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला होता. याचा दुहेरी प्रभाव मान्सूनवर पडला आहे. त्यामुळे देशात मान्सून रखडला आहे. सध्या महाराष्ट्रात सिंधुदुर्ग काही भाग आणि दक्षिण-ईशान्य भारतात मान्सून अडकला आहे.