बेल्हे -अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठ सेवा कार्याच्या बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी 5 जानेवारी रोजी भोसरी येथे विश्वविक्रमी किल्ले बनवा राज्यस्तरीय युवा महोत्सवांतर्गत किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेसाठी बेल्हे (ता. जुन्नर) येथील गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी तयारी केली असल्याची माहिती संचालिका सारिका शेळके यांनी दिली.समर्थ गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी क्रीडा शिक्षक किरण वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी सुरू केली व अवघ्या दीड तासातच मल्हारगड किल्ला बनवला. विद्यार्थी एकाच वेळी असंख्य मातीचे गडकिल्ले साकारणार असून, यातून दुर्ग संवर्धनाचा संदेश देणार असल्याचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी सांगितले.