उत्पादन शुल्क व कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा विश्वास
मंचर – ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्याला महाविकास आघाडीचे स्थिर सरकार मिळाले आहे. हे सरकार पाच वर्षाचा कार्यकाल यशस्वीरित्या पूर्ण करेल, असा विश्वास उत्पादन शुल्क व कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला.
मंचर (ता.आंबेगाव) येथील शिवगिरी मंगल कार्यालयात आंबेगाव-शिरुर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने रविवारी (दि. 5) आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी मंत्री दिलीप वळसे पाटील बोलत होते. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष विष्णू हिंगे, भीमाशंकरचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, माजी आमदार पोपट गावडे, सुर्यकांत पलांडे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष भगवान वाघ, उपाध्यक्ष पांडुरंग पाटील, सदाशिव पवार, किरणताई वळसे पाटील, केशरताई पवार, सचिन भोर, प्राजक्ता शिरीषकुमार रोडे, प्रकाश पवार, शिवाजी लोंढे, वसंत भालेराव, उषा कानडे, मानसिंग पाचुंदकर, बाळासाहेब बाणखेले, सुषमा शिंदे, प्रदीप वळसे पाटील, बाबासाहेब खालकर, उत्तम थोरात, रमेश कानडे, शांताराम हिंगे, ज्ञानेश्वर गावडे, दगडू शिंदे, दादाभाऊ पोखरकर, भीमाशंकरचे कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, निलेश थोरात, अरुणा थोरात, तुलसी भोर, सविता बगाटे, सुनीता गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
पंचायत समितीचे नवनिर्वाचित सभापती संजय गवारी आणि उपसभापती संतोष भोर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. राजू इनामदार, प्रकाश पवार, देवदत्त निकम, शरद अभंग, माजी आमदार सुर्यकांत पलांडे, पोपट गावडे यांची भाषणे झाली. सुत्रसंचालन नीलेश पडवळ यांनी केले. प्रास्ताविक ऍड. विष्णू हिंगे यांनी केले. विवेक वळसे पाटील यांनी आभार मानले.