नवी दिल्ली – इंडिया आघाडीतील ( India aghadi ) नेत्यांची महत्वाची बैठक येत्या १९ डिसेंबरला दिल्लीत होणार आहे अशी माहिती संबंधीत सूत्रांनी दिली आहे. दिल्लीत या आधी ६ डिसेंबरला ही बैठक होणार होती, परंतु काही पक्षांच्या नेत्यांनी या बैठकीला उपस्थित राहण्याबाबत असमर्थता दर्शवली होती. त्यामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आली होती. ६ डिसेंबर रोजी फक्त इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या संसदीय नेत्यांची बैठक झाली होती. १९ डिसेंबरला होणाऱ्या बैठकीत आघाडीच्या जागा वाटपाचा विषय मार्गी लाागण्याची शक्यता आहे.
पाच राज्यांतील विधानसभांच्या ( 5 state election result ) निवडणुकीच्या प्रक्रियेमुळे इंडिया आघाडीतील चर्चेची प्रक्रिया थांबली होती. त्यातच कॉंग्रेसने या पाच राज्यांत अन्य कोणत्याही पक्षाशी आघाडी न करता स्वतंत्रपणेच ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे इंडिया आघाडीच्या घटक पक्षांमध्ये वितुष्ठ आले होते.
विशेषत: समाजवादी पक्षाने ( Samajwadi party ) त्यांना मध्यप्रदेशात कॉंग्रेसने ( Congress ) साथ न दिल्याबद्दल जोरदार आगपाखड केली होती. त्यामुळे समाजवादी पक्ष व कॉंग्रेस मध्ये काही प्रमाणात वितुष्ठ निर्माण झाले होते. अखेर कॉंग्रेस व अखिलेश ( Akhilesh yadav ) यांच्यातील मतभेद संपुष्ठात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे १९ डिसेंबरला होणाऱ्या बैठकीला अखिलेश हे उपस्थित राहणार आहेत असे सांगण्यात येते.
या आघाडीतील घटक पक्षांनी एकत्रित निवडणूक लढवण्याचा निर्धार या आधीच व्यक्त केला आहे. आता फक्त जागा वाटपाचा कळीचा मुद्दा बाकी आहे. तो कसा हाता वेगळा करायचा हाच एकमेव महत्वाचा मुद्दा बाकी आहे. तथापि मोदी सरकारने केंद्रीय यंत्रणांच्या सहाय्याने सर्वच विरोधी पक्षांना जेरीला आणल्यामुळे तसेच त्यांच्या विषयी दडपशाहीचे धोरण अवलंबल्याने या पक्षांना मोदी-भाजपच्या विरोधात एकजूट दाखवण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नाही. त्यामुळे जागा वाटपाबाबत फार ताणून न धरता सामोपचाराने हा विषय मार्गी लाऊन देशापुढे विरोधी ऐक्याचे एकमुखी दर्शन घडवण्याचा प्रयत्न या आघाडीतील ेनत्यांकडून केला जाणार आहे.