शिक्रापूर – बैलगाडा शर्यती सुरूचे श्रेय हे राज्य सरकारचे असल्याचे शिवसेना उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील शेतकरी व बैलगाडा मालकांचे लक्ष लागून राहिलेल्या बैलगाडा शर्यतीचा निकाल जाहीर झाला असून न्यायालयाने दिलेला बैलगाडा शर्यती सुरू करण्याचा निर्णय दिला तर शेतकऱ्यांच्या हिताचा असून त्या निर्णयाचे मी स्वागत करतो.
असे सांगत यापूर्वी गेली साडेसात वर्षे महाराष्ट्रात बैलगाडा शर्यती बंद होत्या, शेतकऱ्यांच्या आवडीच्या त्या बैलगाडा शर्यती बंद असल्याने गावोगावच्या यात्रा जत्रा बंद पडलेल्या होत्या. तसेच बैलगाडा शर्यती नाही म्हणून यात्रेचे स्वरूप पालटले होते, परिणामी पाहुणे, नातेवाइक हे गावोगावी यात्रेला जाणे देखील टाळत होते.
यात्रा बंदीमुळे सर्वच अर्थकारण तसेच रोजगार ठप्प झाले होते. गावोगावी निराशेचे वातावरण पसरले होते; मात्र आता सर्वांना आनंद झाला आहे. सध्या बैलगाडा शर्यत सुरू झाली याचे श्रेय राज्य सरकार मुख्यमंत्री, पशू संवर्धन मंत्री व त्यांची अधिकाऱ्यांचे आहे बाकी सर्व लटकलेले होते, त्यामुळे कोणी ते श्रेय घेऊ नये.
यापूर्वी 20 वर्षांत काय केले हे मी दाखवू शकतो त्यामुळे कोणी श्रेय घेण्याचा प्रयत्न देखील करू नये. मी महाराष्ट्रातील एकमेव लोकप्रतिनिधी आहे की बैलगाडा शर्यत संदर्भातील बारा खटले आहेत, असे देखील आढळराव पाटील यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दिले होते
दहा वर्षांपूर्वीची मी स्वतः बैलगाडा शर्यत सुरू करून दिल्या असताना सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र लिहून दिले होते, त्याप्रमाणे आता बैलगाडा मालक व शौकिनांची न्यायालयाचे नियम व कायदे पाळून बैलगाडा शर्यती सुरू ठेवाव्यात. अन्यथा शर्यती परत बंद पडली, तर ती पुन्हा चालू होणार नाही असा इशारा पाटील यांनी दिला.