मुंबई :- भारतात येत्या ऑक्टोबर व नोव्हेंबर या कालावधीत होत असलेल्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेनंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आपले पद सोडणार असल्याचे बीसीसीआयने संकेत दिले आहेत.
राहुल द्रविड यांनी वैयक्तिक कारणाने या पदावर यापुढे कार्यरत राहणे शक्य नसल्याचे बीसीसीआयला कळविले आहे.
टी-20 विश्वकरंडक स्पर्धेनंतर रवी शास्त्री यांची मुख्य प्रशिक्षकपदाची मुदत संपली होती व त्यानंतर ही जबाबदारी द्रविड यांच्याकडे सोपविण्यात आली होती. त्यावेळीही हे पद स्वीकारण्याची द्रविड यांची तयारी नव्हती.
मात्र, त्यावेळी बीसीसीआयचे अध्यक्ष व द्रविड यांचे जिवलग मित्र सौरव गांगुली यांच्या विनंतीमुळे द्रविड यांनी ते पद स्वीकारले होते.
भारतीय संघ सातत्याने परदेश दौरे करतो व त्यामुळे फार काळ कुटुंबापासून दूर राहण्याची द्रविड यांची तयारी नव्हती. त्यामुळे कदाचित यंदा भारतातच होत असलेली एकदिवसीय सामन्यांची विश्वकरंडक स्पर्धा जरी भारतानेच जिंकली तरीही आपल्या निर्णयात कोणताही बदल होणार नाही, असेही द्रविड यांनी
सांगितले आहे.