बारामती-मागील काही दिवसांपासून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या प्रमुख मागणीसाठी आझाद मैदान येथे आंदोलन सुरु आहे. अनेक एसटी कर्मचारी आत्मदहनाचा प्रयत्न करीत आहेत.
राज्य शासनानेही कर्मचाऱ्यांच्या संपाविरोधात कठोर भूमिका घेऊ नये, आतापर्यंत जवळपास महाराष्ट्रातील 2000 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. हे दुर्दैवी आहे. आपण यामध्ये लक्ष द्यावे,
असे साकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दौंड तालुका निरीक्षक बापूराव सोलनकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे घातले आहे, यावेळी सोलनकर यांनी बारामती येथील एमआयडीसी येथील डेपोमध्ये उपोषण कर्त्यांची भेट घेतली.
एसटी कर्मचाऱ्यांचे आत्महत्या सत्र थांबवण्यास पुढाकार घ्यावा.. त्यांच्या मुलांच्या भवितव्याचा विचार करून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे शासनात विलिनीकरण करण्याच्या या मुख्य मागणीवर त्वरित तोडगा काढावा, एसटी कर्मचायाऱ्यांची परिस्थिती वाईट झालेली आहे.
त्यांच्या कुटुंबाची मोठ्या प्रमाणावर उपासमार होत आहे. एसटी ही जीवनवाहिनी आहे, प्रत्येक एसटी डेपोच्या बाहेर अनेक दुकाने, त्यावर अवलंबून असतात. त्यामुळे अर्थकारण थांबले आहे, त्यामुळे सरकारने यामध्ये गांभीर्याने पाहिले पाहिजे. सोलनकर यांनी यावेळी सांगितले.