नवी दिल्ली – दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपल्या जोरदार अभिनयाने करोडो प्रेषकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे सुपरस्टार अभिनेते ‘रजनीकांत’ लवकरच राजकरणात एण्ट्री घेणार आहेत. दरम्यान, रजनीकांत यांच्या एण्ट्रीमुळे तामिळ्नाडू राज्यातील राजकारणात मोठा बदल पाहायला मिळू शकतो, असं म्हंटल जात आहे.
रजनीकांत पुढील वर्षी ऑगस्ट-सप्टेंबर 2020 पर्यंत आपल्या नवीन पक्षाची स्थापना करणार आहेत. सध्या पक्षाच्या उद्दिष्टांवर काम अंतिम टप्प्यात सुरु आहे, अशी माहिती एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. तसेच पक्षाची स्थापना केल्यानंतर रजनीकांत यांना नवी ओळख मिळू शकते, असं देखील सूत्रांनी सांगितले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी रजनीकांत यांना भाजपचे सहयोगी म्हटले जात होते. यानंतर 8 नोव्हेंबर रोजी रजनीकांत यांनी यावर स्पष्टीकरण देत म्हटले की, ‘माझे भगवेकरण कुणी करु शकत नाही’.