आरोग्य, सकारात्मकता आणि स्वप्ने यांचा फार जवळचा संबंध आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या तीन मूलभूत गरजांची पूर्तता खरं तर शरीरासाठीच होत असते. पण मनाचं काय? ते दिसत नसलं तरीही असतंच. आपल्या जगण्यापलीकडच्या जीवनाला मनामुळे वेगळं असल्याची प्रचीती येते.
काही वेळा असं वाटतं की, अनेकांकडून केवळ शरीरासाठीच सर्व काही केलं जातं. पण मनाचा, मनातल्या मनात, मनमुरादपणे किंवा मन मारून मनपसंद असा कधी विचार खरंच होतो का? निदान तसं दिसत तरी नाही. मनंच आपल्याला जगायला शिकवतं, मनंच आपल्याला पदोपदी अनेकविध निरनिराळ्या प्रसंगांची अनुभूती देतं. दुसऱ्याचंच काय पण आपल्या स्वतःच्या मनाचा सुद्धा थांग पत्ता लागणं मुश्कील असतं. आपल्या शरीरावर ताबा ठेवून त्याला स्थिर करू शकतो पण मनावर नियंत्रण ठेवणं मोठं कठीण काम असतं. म्हणून कुठलेलंही काम करतांना आपल्या दैनंदिन जीवनात प्रत्येकाने या तीन मुद्यांचा विचार करायला हवा
अंतर्मनातील विचार महत्त्वाचे
साधेपणा म्हणजे भोळेपणा नसतो
स्वप्नंच देतात सौदर्याची अनुभूती