राजगुरूनगर -गडद (ता. खेड) येथील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असून, यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 47 लाख रुपये मंजूर आले आहेत. या कामाचे भूमिपूजन सोशल डिस्टन्स ठेवत व तोंडाला मास्क लावून काही ठराविक ग्रामस्थांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्या हस्ते शनिवारी (दि. 25) करण्यात आले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण चांभारे, पंचायत समिती सदस्या मंदा शिंदे, खेड पंचायत समितीचे माजी सभापती सुरेश शिंदे, खेड बाजार समितीच्या माजी उपसभापती सुगंधा शिंदे, ऍड. सुखदेव पानसरे, गडदच्या सरपंच शोभा तळेकर, सखाराम शिंदे, सुभाष तळेकर, ग्रामपंचायत सदस्य व काही मोजके ग्रामस्थ उपस्थित होते. गडद गावासाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उन्हाळ्यात गंभीर होता.
यासाठी आमदार दिलीप मोहिते पाटील, निर्मला पानसरे, अरुण चांभारे यांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आले होते. गावाच्या पाणी योजनेसाठी 47 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आहे. यामध्ये पाण्याची टाकी बांधणे, पाण्याची विहीर खोदणे आणि गावातील टाकीपर्यंत पाइपलाइन टाकणे अशी कामे केली जाणार आहेत.
यावेळी निर्मला पानसरे म्हणाल्या की, महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्याचा प्रयत्न जिल्हा परिषद करीत आहे. गडद येथील पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा प्राधान्य दिले. गावाच्या विकासाच्या कामांवर ग्रामस्थानी लक्ष ठेवले पाहिजे. गावातील विकास काम चांगल्या दर्जाचे करून घेण्याचे काम ग्रामस्थांचे आहे.
करोनाचे संकट आपल्यावर आले आहे. त्यामुळे निधीत कपात झाली आहे. विकास कामांना अडथळे येत आहेत. मात्र पुढील काळात आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्याला मोठा निधी उपलब्ध करू.
– निर्मला पानसरे, अध्यक्षा, जिल्हा परिषद, पुणे