क्विन्सटाऊन – न्यूझीलंडविरुद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताच्या महिला संघाने सलग चार पराभव स्वीकारले व ही मालिका गमावली आहे.
पहिल्या तीन सामन्यात स्टार फलंदाज स्मृती मानधना खेळू शकली नव्हती. चौथ्या सामन्यात ती खेळली. मात्र, अवघ्या 13 धावा काढून बाद झाली. तिने क्षेत्ररक्षण करताना अफलातून कामगिरी केली. मात्र, तिची फलंदाजी बहरली नाही.
मुळातच न्यूझीलंडमध्ये दाखल झाल्यावर तिला वाढीव विलगीकरण कालावधीचा सामना करावा लागला होता. मात्र, तरीही तिचा फॉर्म ओसरल्याची टीका आता होऊ लागली आहे. बीसीसीआयच्या महिला क्रिकेट समितीच्या सदस्या व माजी क्रिकेटपटू डायना एडल्जी यांनीच मानधनाला टीकेचे लक्ष्य केले आहे.