मुंबई – जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक सीताराम पाटील गायकर यांनी माजीमंत्री मधुकर पिचड यांची साथ सोडून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाट धरली आहे. त्यांच्यासहीत अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती परबतराव नाईकवाडी, काही संचालक व समर्थक मंगळवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झाले. मात्र गायकर यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशानंतर आधीच्या टीकाटीप्पणी चर्चेत आल्या आहेत.
२०१९ मधील विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य मधुकर पिचड आणि त्यांचे पुत्र वैभव पिचड यांचाही समावेश होता. पिचड यांच्यासोबत सीताराम गायकर देखील भाजपमध्ये गेले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात आज उपमुख्यमंत्री ना. @AjitPawarSpeaks व प्रदेशाध्यक्ष ना. @Jayant_R_Patil यांच्या प्रमुख उपस्थितीत अहमदनगर जिल्हा सहकारी बँकचे माजी चेअरमन सिताराम गायकर यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. pic.twitter.com/pu6Tf0M02L
— NCP (@NCPspeaks) March 16, 2021
अडचणीच्या काळात पिचड आणि त्यांचे साथीदार गायकर यांनी राष्ट्रवादी पक्ष सोडल्यामुळे शरद पवार आणि अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी अजित पवारांनी पिचड यांच्यासह गायकर यांच्यावर वैयक्तीक टीका केली होती. ” नाही त्यांच धोतर फेडल तर मग बघा” अस अजित पवारांनी म्हटलं होतं.