मुंबई – मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाणे येथील सभेत मशिदीवरील भोंगे उतरवण्याबाबत पुन्हा एकदा वक्तव्य केले राज ठाकरे म्हणाले, मशिदींच्या भोंग्यासंबंधी सर्व मशिदींना 3 मे पर्यंत मुदत देतो, या नंतर जर कोणी भोंगे काढले नाहीत तर देशभर मशिदींसमोर हनुमान चालीसा लावण्यात येणार, असा इशारा ठाकरे यांनी दिला. राज ठाकरेंच्या या भूमिकेवरुन अनेक प्रतिक्रिया येत आहे.
यातच राष्ट्रवादी काँग्रेसकडून हनुमान जयंतीच्या प्रसादाने मुस्लिमांचा आजचा रोजा सोडण्यात येणार आहे. पुण्यातील साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिरात आज (१६ एप्रिल) संध्याकाळी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. यावरूनच आता केशव उपाध्ये यांनी थेट शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर टीका केली आहे.
केशव उपाध्ये यांची फेसबुक पोस्ट
‘शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील म्हणतात, मी शरद पवार आणि राष्ट्रवादीवर इतकी टीका केली तरी त्यांनीच मला मंत्री बनवलं. याचा अर्थ जसं उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावर बसवलं तसं शिवसेनेचे मंत्री कोण असलेले याची यादी पवारांनी ठरवले होती. सेक्युलर विचारधारेचा सरकार यावर म्हणून महाविकास आघाडीची स्थापना झाली असं शरद पवार जाहीरपणे बोलले. त्यामुळे किमान समान कार्यक्रम हे थोतांड असल्याचं सिद्ध झालं आहे. त्याच बरोबर शिवसेनेच्या ढोंगी हिंदुत्वाचा बुरखा फाटला आहे. राष्ट्रवादीच्या रिमोटवर काँग्रेसचा सेल टाकून शिवसेनेचा गेम सुरू आहे. परंतु मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या निष्ठावंत आणि कडवट शिवसैनिकांची भावनिक दिशाभूल करत आहेत. उघडपणे राष्ट्रवादी काँग्रेसने हनुमान मंदिरात इफ्तार पार्टी घेणार असं जाहीर करूनही त्यावर मौन बाळगणार्या शिवसेनेची बिकट अवस्था माननीय बाळासाहेब ठाकरे असते तर कधीच झाली नसती.”