शिरूर -नगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा तालुक्यातील भाजी विक्रेते शिरूर तालुक्यात नियमित ये-जा करतात. दरम्यान, पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथील एका नागरिकाचा करोनामुळे मृत्यू झाला असल्यने शिरूरकरांमध्ये आता भीती पसरली आहे. कारण या भागातून अनेक भाजीपाला विक्रेते शिरूर शहरामध्ये भाजी घेऊन येत असतात. त्यामुळे आता शिरूरकरांनी सावध राहण्याची गरज आहे.
पारनेर तालुक्यातील पिंपरी जेलसेन हे गाव शिरूरपासून केवळ 25 किलोमीटर अंतरावर आहे. या गावातील एकाचा मंगळवारी (दि. 12) मृत्यू झाला आहे. ही मृत व्यक्ती निघोज व परिसरातील लोकांच्या संपर्कात आली आहे.
दरम्यान, शिरूरच्या बाजपेठेत निघोज, जवळा, सांगावीसूर्या, गांजीभोयरे, पिंपरी जेलसेन या गावातील अनेकजण भाजीपाल्याचा व्यापार करण्यासाठी येतात त्यामुळे शिरूरकरांनी काळजी घेण्याची गरज असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर फिरत आहे.