मुंबई – चाळीस आमदार ज्या पद्धतीने पन्नास खोके देऊन फोडण्यात आले तो नेमका काय व्यवहार होता ? याची एसआयटी चौकशी झाली पाहिजे अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. यानंतर आता राऊत यांच्या या मागणीला शिंदे गटाच्यावतीने प्रत्युत्तर देण्यात आले आहे. “खोके घेतल्याबद्दल जे तुरुंगात गेले होते त्यांनाच त्याच महत्व कळत,खोके काढायचे असतील तर कोणाचे काढले जातील हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे लोक दुखावले जातील असं बोलू नका” असा सूचक इशारा शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी दिला आहे.
दिशा सालियन प्रकरणामध्ये उपमुख्यमंत्र्यांनी एसआयटी नेमण्याची घोषणा केली. यानंतर ठाकरे गटाचे नेते चांगलेच आक्रमक झाले होते. त्यात राऊत यांनी दिल्लीतून खोके प्रकरणाबाबत एसआयटी नेमावी अशी मागणी केली यानंतर याला दीपक केसरकरांनी जोरदार उत्तर दिले. “तुम्हाला लोकांना भेटता आलं नाही त्यांच्या मतदार संघातील काम करता आली नाही,ती काम कोट्यवधी रुपयांची आहेत. पैसे घेऊन राजकारण करता आलं असत तर सगळे श्रीमंत मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री झाले असते पंतप्रधानही बनू शकले असते” असा टोला देखील केसरकर यांनी लगावला.
काय म्हणाले होते संजय राऊत नेमकं
सरकार मागेल त्याला एसआयटी देत आहे. सरकारने एसआयटीचे रेशनिंग केले आहे. चाळीस आमदार ज्या पद्धतीने पन्नास खोके देऊन फोडण्यात आले तो नेमका काय व्यवहार होता याची एसआयटी चौकशी झाली पाहिजे अशी मागणी राऊत यांनी केली आहे. संपलेले विषय पुन्हा काढून पोलीस यंत्रणेचा गैरवापर करत आहे. आम्ही चौकशीला सामोरे जाऊ तुम्ही मात्र तोंडावर पडाला असा इशारा देखील यावेळी राऊत यांनी दिला. सरकारपक्षातील अनेकांची प्रकरने बाहेर पडलेली आहेत त्याचीही एसआयटी चौकशी करा या सरकारला एसआयटी स्थापन करण्याची खाज आहे,खाजवत बसा अशा शब्दात राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.