जयपूर – राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्याबाबत नालायक, नकारा-निकम्मा, गद्दार, करोना असे शब्द वापरत असतात. स्वपक्षाच्याच नेत्याबद्दल असे शब्द वापरताना गेहलोत यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने विचार करावा; शक्य तर संयम पाळावा, अशा शब्दांत ज्येष्ठ कॉंग्रेस नेते शशी थरुर यांनी गेहलोत यांना घरचा आहेर दिला आहे.
सांगलीचे सुपुत्र नायब सुभेदार जयसिंग भगत शहीद
थरूर म्हणाले, राजकारण या गलिच्छ पातळीवर पोहोचले नसावे. जेव्हा आपण आपल्याच सहकाऱ्यांबद्दल बोलत असतो तेव्हा थोडा विचार करूनच बोलले पाहिजे. मी 14 वर्षे राजकारणात आहे, आजपर्यंत मी कोणावरही अशा शब्दांत हल्ला केलेला नाही, ही अभिमानाची गोष्ट आहे. कधीही कोणाबद्दल असे काही बोलण्याचा किंवा भडकावण्याचा प्रयत्न केला नाही. शिवाय ती कॉंग्रेसची संस्कृतीही नाही, हे गेहलोत यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे.
हिमाचल हे पहिले हरित राज्य बनणार – मुख्यमंत्री सुखू
जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना थरुर म्हणाले, मी माझ्या सहकाऱ्यांना विनंती करतो की माझ्या स्वत:च्या बंधू-भगिनींबद्दल असे बोलणे चांगले नाही. लोकांचे मत भिन्न असले तरी आपण आपले मतभेद दूर करण्याचा प्रयत्न करणे चांगले आहे. पण, अर्थातच ते सांगण्याचे इतर मार्ग असू शकतात. खासगीतही काहीही बोलता येईल. मला हेही आवडेल की पक्षात आपण एकमेकांसोबत प्रेमाने जगले पाहिजे.
भाजपमधील प्रत्येक व्यक्तीचे प्रत्येक विषयावर समान मत आहे का? असे विचारुन थरुर म्हणाले की, लोकशाहीत दोन व्यक्तींमध्ये मतभेद असू शकतात. तुमची विचारधारा एकच असेल आणि तुम्ही एकाच कारणासाठी लढत असाल, तर शेवटी नेतृत्व कोण करणार हे पक्षालाच ठरवावे लागणार नाही का? मला वाटते की अंतर्गत लढा हे प्रत्येक पक्षाचे वास्तव आहे. मात्र, हे अंतर्गत वाद कधीच चव्हाट्यावर आणायचे नसतात, विशेषत: पक्ष अडचणीत असतो तेव्हा, असेही थरुर शेवटी म्हणाले.