खटाव – ठराविक महिला राजकीय, सामाजिक क्षेत्रात ठसा उमटवतात. असेच एक धडाडीचे वादळी व्यक्तीमत्व म्हणून ओळखल्या जाणार्या सौ. शशिकाला भगत या होत्या. त्यांच्या जाण्याने शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची आई हरपली अशा शब्दात माजी कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांनी सौ. भगत यांना श्रध्दांजली अर्पण केली.
जाखणगाव, ता. खटाव येथील शेतकरी नेते, येस ग्रुपचे संस्थापक संजय भगत व सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र भगत यांच्या मातोश्री सौ. शशिकला भगत यांचे निधन झाले. यांच्या तिसर्याच्या विधी वेळी माजी कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह ज्येष्ठ नेते बाळासाहेब इंगळे, श्रीकांत लावंड, राजेंद्र कचरे, ज्योतीनाना सावंत, अॅड. अनिल गोडसे,आरपीआयचे गणेश भोसले यांनी श्रध्दांजली अर्पण केली.
जाखणगावच्या शिंदे घराण्यातील माहेरवाशींनी असलेल्या शशिकला भगत यांनी वेगळा ठसा राजकीय क्षेत्रात उमटवला होता.सामाजिक क्षेत्रात हिरीरीने भाग घेऊन पुढे जाणार्या महिला म्हणून त्यांची ओळख होती. शेतकरी संघटनेत माझ्यासोबत चळवळीत सहभागी असलेल्या संजय भगत यांच्या त्या मातोश्री असल्या तरी आमच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांची ती आईच होती, अशी भावना खोत यांनी व्यक्त केली.
यावेळी शेतकरी संघटनेचे सूर्यकांत भुजबळ, तानाजीराव देशमुख, शिवाजी शिंदे, बाळासाहेब गाढवे, बाळासाहेब शिंदे, नाम फाउंडेशन समन्वयक बाळासाहेब शिंदे, जरंडेश्वर उत्पादक कंपनीचे सुरेश फाळके, पत्रकार शशिकांत धुमाळ, बाळासाहेब भगत यांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी माजी प. सं. सदस्य दगडूदादा शिंदे, माजी सरपंच गणपतराव शिंदे, चेअरमन संतोष शिंदे, ज्ञानेश्वर जाधव, अशोक पाटील, ज्ञानेश्वर शिंदे, रघुनाथ साळुंखे, राजेंद्र यादव, समीर फडतरे, धनाजी जाधव, मानाजी शिंदे, संजय पाटील, किसनबाबा देशमुख, डॉ. दशरथ जगताप आदी उपस्थित होते.