विडणी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतातील सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला. त्यांनी त्यांची क्षमता योग्यता सिद्ध केली असून माढा लोकसभा मतदारसंघात खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून तब्बल एक लाख कोटी रुपयांचा निधी आला असून देशातील इतर मतदारसंघापेक्षा हा मतदारसंघ सर्वात पुढे आल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. अजय मिश्रा यांनी केले.
ना. अजय मिश्रा हे फलटण दौऱ्यावर असताना विडणी ग्रामपंचायत येथे केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून “भारत संकल्प यात्रा”कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, मुख्यमंत्री कार्यालयाचे अवर सचिव धीरज अभंग,सरपंच सागर अभंग,जयकुमार शिंदे,अभिजित नाईक निंबाळकर, उपजिल्हाधिकारी गलांडे,प्रांताधिकारी सचिन ढोले,तहसीलदार डॉ. अभाजीत जाधव तसेच इतर अधिकारी व भाजपचे पदाधिकारी तसेच,ग्रामपंचायत सदस्य, व विडणी ग्रामस्थ उपस्थित होते.
मिश्रा यांनी सांगितले की, ही भारत संकल्प यात्रा प्रत्येक गावात जाणार असून केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजनांचा लाभ शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे,यासाठी या यात्रेच्या निमित्ताने सर्व योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघ देशातील सर्वात मोठा विकासासाठी पुढे आणला असून देशात प्रत्येकाला घर, शौचालय, लाईट, गॅस,पिण्याच्या पाण्याची गरज होती, ती पूर्ण केली असून,मोदी सरकारने सर्वात जास्त स्टेट हायवे,शिक्षण आरोग्य, मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या. विविध भागात 4 कोटी घरे दिली,तसेच 11 कोटी शौचालय, पुढील पाच वर्षांसाठी 80 कोटी लोकांना मोफत धान्य दिले आहे, नल से जल योजनेच्या माध्यमातून शुद्ध पाणी पोहोचविले तुमच्या विडणी साठी जलजीवन योजनेसाठी 32 कोटी रुपये दिले,तसेच इतर ठिकाणी 13 कोटी घरांना पाणी पोहोचवले,प्रत्येक गावात लाईट पोहोचवली असे सांगितले.
विडणी गावामध्ये भारत सरकारच्या वतीने राष्ट्रीय पातळीवरील भारत संकल्प यात्रा कार्यक्रम आयोजित केला होता, त्याचे प्रास्ताविक लीकनियुक्त सरपंच सागर अभंग यांनी केले, तरी फलटण तालुक्यातील सर्व सरकारी बँका, कृषी विभाग,तहसील विभाग अधिकारी,रेशनिंग, पुरवठा अधिकारी, आरोग्य अधिकारी, कृषी विषयक माहिती, व्हेटर्रनरी अधिकारी उपस्थित होते.