बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याने आपल्या “मानवीय रावण’या वक्त्यव्यावर ट्रोल झाल्यानंतर माफी मागितली आहे. सैफ म्हणाला, श्री प्रभुराम हे कायमच धार्मिकता आणि विरताचे प्रतीक राहिलेले आहेत. दरम्यान, सैफ म्हणाला होता की, आपल्या आगामी “आदिपुरुष’ चित्रपटात रावण हा “मानवीय’ असल्याचे दाखविण्यात येणार आहे.
View this post on Instagram
सैफने हे ट्विट केल्यानंतर अनेक जणांनी यावर आक्षेप घेत त्याला ट्रोल केले होते. तसेच भाजप नेता राम कदम यांनी त्यावर जोरदार टीका केली होती. राम कदम म्हणाले, दिग्दर्शक ओम राऊत यांनी “तानाजी’ चित्रपट साकारला आणि त्याचे जगभर कौतुक झाले. त्यांनी हिंदू अभिमान आणि मराठी अस्मितेला न्याय दिला होता.
View this post on Instagram
पण जर “आदिपुरुष’मध्ये रावणला चांगले दाखवायचा विचार केला आणि सीतामाईचे अपहरण ही अमानवीय कृती योग्य दाखविण्याचा प्रयत्न केलास आम्ही हे कधीही होऊ देणार नाही, अशा शब्दांत इशारा दिला.
View this post on Instagram
यानंतर दिलगिरी व्यक्त करत स्पष्टीकरण देताना सैफ म्हणाला, “एका मुलाखतीदरम्यान मी केलेल्या एका विधानाने वाद आणि लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. माझा हेतू तसा नव्हता किंवा मी मुद्दाम काही बोललो नाही. तरी मी आपल्या सर्वांची माफी मागत असून मी माझे विधान मागे घेत आहे. भगवान राम माझ्यासाठी नेहमीच नीतिमत्त्वाचे आणि पराक्रमाचे प्रतीक राहिले आहेत. “आदिपुरुष’ हे वाईट गोष्टींवर चांगल्या गोष्टींनी मिळविलेला विजय आहे, असे त्याने स्पष्ट केले.