शिर्डी – देशाच्या अस्मिेतेचे प्रतिक असलेले चांद्रयान-3 चंद्रावर
सुरक्षितपणे उतरावे व भारतीय शास्त्रज्ञांना अपेक्षित असलेले उद्देश सफल होण्यासाठी शिर्डीतील तरुणांनी व भाविकांनी साईबाबांना साकडे घातले.
साईबाबांच्या द्वारकामाई मंदिरासमोर काल (रविवार) सायंकाळी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे, मनीलाल पटेल, ताराचंद कोते, विजय आप्पासाहेब कोते आदींच्या पुढाकारातून या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी साईबाबांची पूजा व आरतीही करण्यात आली. हातात तिरंगा घेतलेल्या ग्रामस्थ व भाविकांनी या वेळी दिलेल्या साईबाबा व भारतमातेच्या घोषणांनी परिसरात चैतन्य पसरले. यशस्वी सचिन वाणी या विद्यार्थिनीने चांद्रयान मोहिमेची उपयुक्तता या वेळी विषद केली.
या वेळी धीरज समधडीया, सुनील परदेशी, मयूर चोळके, नारायण जराडे, सुरेंद्र महाले, आकाश वाडेकर, बबलू वरपे, भावेश पटेल, अरुण हजारे, आतिक पठाण, मोहन क्षत्रीय, सचिन वाणी, आबा ढाकणे, सचिन शेजवळ, रितेश भालेराव, आदित्य वारुळे, अय्याज पठाण, दर्शन वैद्य, रुपेश पोरवाल, सनी गागरे, पराग जैन, सुनील जोशी, प्रवीण शिंदे, सोंनगड आदींसह साईभक्तांची उपस्थिती होती.
सगळ्या जगाचे सध्या चांद्रयानाकडे लक्ष लागले आहे. भारतीय बनावटीच्या
चांद्रयानाच्या यशामुळे आपला देश
अंतराळातील प्रगतीतही मागे नाही असा जगभर संदेश जाईल, असा विश्वास संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे यांनी व्यक्त केला.