देहूगाव, (वार्ताहर) – तीर्थक्षेत्र देहू गाथा परिवार व गाथा पुनरुत्थान दिन सोहळा समितीच्या वतीने गाथा पुनरूत्थान दिवस साजरा करण्यात आला. या वेळी देहूगाव येथील इंद्रायणी नदीच्या आनंद डोहात ज्या ठिकाणी संत तुकोबारायांचे अभंग गाथा तरल्या. तेथे पाण्यात उभे राहून संत तुकोबांच्या निवडक अभंगाचे गाथा वाचन करण्यात आले. त्यात राज्यभरातून भाविक सहभागी झाले होते.
पांढरे शुभ्र उपरणेस, टोप्या असा पेहराव परिधान केलेले भाविकांसह महिला भाविक इंद्रायणी काठावरील पायऱ्यांवर बसून अभंगाचे वाचन करीत होत्या. त्यामुळे इंद्रायणी पुन्हा गाथा तरल्याचा तोच आनंद सोहळा अनुभवत होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरूषोत्तम महाराज मोरे, गाथामूर्ती तुकाराम महाराज घाडगे, गाथा मंदिराचे संस्थापक पांडुरंग महाराज घुले, कीर्तनकार प्रशांत महाराज मोरे, नगराध्यक्षा पूजा दिवटे, नगरसेवक सुधीर काळोखे, संत तुकाराम अन्नदान मंडळाचे प्रशांत भालेकर, लक्ष्मण कंद,
गाथा परिवाराचे अध्यक्ष उल्हास पाटील, किशोर ढमाले, विजय महाराज भोईर, प्रतिमा परदेशी, गीतांजली देवाळकर, अभय महाराज जगताप, प्रभाकर भोसले, किशोर कडू, चंद्रकांत कोलते, सूर्यकांत शिवले, ज्ञानदेव पांडुळे, सुधीर मेमाणे, ममता झांजूरने, भरत महाराज कदम, अभय महाराज जगतात आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर ढमाले यांनी केले. अभिजित घोरपडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. ज्ञानेश्वर मुळीग यांच्या अभंग गायनाने या सोहळ्याची सांगता झाली.