दुस-या दिवसअखेर महाराष्ट्राच्या २ बाद २१९ धावा
पुणे : ओडिशाचा पहिला डाव सर्वबाद २९३ धावसंख्येवर आटोपल्यानंतर महाराष्ट्राने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत दुस-या दिवसअखेर ७३ षटकांत २ बाद २१९ अशी मजल मारली आहे. महाराष्ट्र अजूनही ७४ धावांनी पिछाडीवर आहे.
Stumps Day 2: Maharashtra – 219/2 in 72.6 overs (A R Bawane 80 off 184, R D Gaikwad 110 off 180) #MAHvODI @paytm #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) February 5, 2020
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर ही लढत सुरू आहे. महाराष्ट्राने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतल्यानंतर ओडिशाने पहिल्या डावात १०१.१ षटकांत सर्वबाद २९३ धावा केल्या. ओडिशाकडून राजेश धुपेरने नाबाद सर्वाधिक ११०(१५२) शंतनू मिश्राने ८४(२६७), अनुराग सांरगीने ४१(८७) आणि सूर्यकांत प्रधानने २८(१३) धावांची खेळी केली.
End Innings: Odisha – 293/10 in 101.1 overs (Pappu Roy 1 off 4, Rajesh Dhuper 110 off 152) #MAHvODI @paytm #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) February 5, 2020
महाराष्ट्राकडून गोलंदाजीत आशय पालकरने सर्वाधिक ४, सत्यजित बच्छाव आणि एम जी चौधरीने प्रत्येकी २ तर मनोज इंगळेने १ गडी बाद केला.
त्यानंतर ओडिशाच्या २९३ धावसंख्येला प्रत्युत्तर देताना महाराष्ट्राची सुरूवात चांगली झाली नाही. अवघ्या ३८ धावसंख्येवर महाराष्ट्राचे दोन फलंदाज तबूंत परतले होते. स्वप्निल गुगळे ७ आणि जे.एस. पांडे १७ धावा काढून बाद केले. ओडिशाचा गोलंदाज राजेश महन्तिने गुगळेला तर सूर्यकांत प्रधानने जे एस पांडेला बाद केले.
WICKET! Over: 18.5 J S Pande 17(49) ct Rajesh Dhuper b Suryakant Pradhan, Maharashtra 38/2 #MAHvODI @paytm #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) February 5, 2020
त्यानंतर ऋतुराज गायकवाड आणि अंकित बावणेने महाराष्ट्राचा डाव सावरत दुस-या दिवसअखेर संघाची धावसंख्या ७३ षटकांत २ बाद २९३ पर्यंत नेली. दुस-या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा ऋतुराज गायकवाड नाबाद ११०(१८१) आणि अंकित बावणे नाबाद ८०(१८४) धावांवर खेळत होता.