पुणे – मुंबई, ठाणे, औरंगाबादनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गर्जना आज पुण्यात होत आहे. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात राज ठाकरे यांनी सभेला सुरुवात करतानाच राणा दाम्पत्यांवर हल्ला बोल केला आहे.
राज ठाकरे म्हणाले,’हे राणा दाम्पत्य उठलं आणि मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा म्हणायला गेले. ती काय मशीद आहे का? त्यांना अटक केली. मधु इथे आणि चंद्र तिथे असे अटक झाले. नंतर त्यांना सोडण्यात आलं. शिवसेनेकडून त्यांना वाट्टेल ते बोललं गेलं. एवढा राडा झाल्यानंतर लडाखमध्ये ते दाम्पत्य आणि संजय राऊत एकत्र जेवताना दिसले. शिवसेनेतल्या पदाधिकाऱ्यांना या गोष्टीचं काहीच वाटत नाही? असं म्हणत राज ठाकरे यांनी राणा दाम्पत्यांसह शिवसेनवरही हल्लाबोल केला.
ते पुढे म्हणाले,’ज्यांच्यामुळे हे सगळं घडल, त्यांच्यासोबत तुम्ही लडाखमध्ये जेवताय? हे सगळे ढोंगी आहेत. यांचं हिंदुत्व पकपकपक बोलण्यासाठीच आहे. यांना दुसऱ्या गोष्टी नको आहेत.’ अशी ते म्हणाले..