मुंबई – शिवसेनेचे माजी मंत्री आणि सध्या शिंदे गटात सामील झालेले रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे वारंवार मी बाळासाहेबांचा मुलगा आहे असं सांगतात, ते तुम्ही आहातच याबाबद्दल तुम्हाला काही संशय आहे का ? अशा शब्दात उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत रामदास कदम यांनी जहरी टीका केली. दापोली येथे घेतलेल्या सभेत कदम बोलत होते.
उद्धव ठाकरे हेच गद्दार आहेत असा घणाघात यावेळी कदम यांनी केला. “उद्धव ठाकरे तुम्ही शिवसेना मोठी केली नाही,अनेक शिवसैनिक जेलमध्ये गेलेत अनेकांचे संसार उद्धस्त झालेत तेव्हा ही शिवसेना मोठी झाली आहे. तुमचं काय योगदान ? मी बाळासाहेबांचा मुलगा आहे हे किती वेळा सांगशील आम्ही कोणी ते नाही म्हंटल आहे का.. मी बाळासाहेबांचा मुलगा आहे .. पण हे किती वेळा सांगशील तुझ्या मनात काही संशय आहे का ?” अशा शब्दात रामदास कदम यांनी थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
काय म्हणले रामदास कदम नेमकं यावेळी
बाळासाहेब ठाकरे वरून पाहत असतील आणि सांगत असतील,माझा मुलगा उद्धव शरद पवारांच्या,सोनिया गांधींच्या नादी लागून बिघडलाय माझे विचार घेऊन तू पुढं चल माझे आशीर्वाद आहेत असं बाळासाहेब वरून सांगत असतील असं देखील कदम यावेळी म्हणाले. तसेच प्लास्टिक बंदीचा कायदा केला तेव्हा आदित्य ठाकरे पुढे आले आणि मी कायदा केला असं म्हणाले,तू काय केलंस अजून लग्न देखील केलं नाही अशा शब्दात कदम यांनी टोलेबाजी केली. तसेच आदित्य मला काका म्हणायचा,काकाच्या पाठीत खंजीर खुपसलास आणि काकाच्या जागेवर टुणकन येऊन बसलास अशी टीका देखील रामदास कदम यांनी यावेळी केली.