औरंगाबाद – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज औरंगाबाद येथे जाहीर सभा होत आहे. या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मनसैनिक मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सभास्थळी पोहोचले असून राज यांनी भाषणाला सुरुवात केली आहे.
भाषणाच्या सुरुवातीलाच राज्य सरकारवर टीका केली. सभा होणार, की नाही होणार अशा चर्चा सुरू होत्या. मात्र मी कुठेही सभा घेतली तरी ती दुरदर्शनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचणारच आहेत. मग ही उठाठेव कशाला असा सावल राज यांनी उपस्थित केला.
दरम्यान राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात इतरही मुद्दे असल्याचं म्हटलं. यावेळी पाणी टंचाईचा मुद्दा असेल किंवा इतरही मुद्दे आहेत. मात्र यावेळी राज ठाकरे यांनी इंधन दरवाढ आणि महागाईवर चकार शब्द काढला नसल्याचं दिसून आलं.
राज ठाकरे यांनी अपेक्षेप्रमाणे पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसवर कडाडून टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासूनच महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण सुरू करण्यात आलं. याच शरद पवारांनी बाबासाहेब पुरंदरे यांना अखेरच्या काळात त्रास दिला. केवळ बाबासाहेब हे ब्राह्मण असल्यामुळे शरद पवारांनी त्यांना त्रास दिल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला.
पुन्हा अल्टीमेटम
मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्दावर राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आक्रमक पावित्रा घेतला आहे. आज 1 मे आहे. 4 मेपासून आपला कार्यक्रम हाती घेतला जाणार असून हिंदूंना माझी विनंती आहे की, जिथे बांग सुरू असेल तिथं हनुमान चालिसा लावावी, अस राज म्हणाले. यावेळी त्यांनी पोलिसांना देखील बांग बंद करण्याचा इशारा दिला.