पुणे -मागील आठवड्यापर्यंत पावसाच्या आगमनाकडे डोळे लावून असलेल्या मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला मागील पाच दिवसांत झालेल्या पावसाने तारले आहे. यात काही जिल्ह्यांमधील तूट भरून निघत आहे. पण, काही जिल्ह्यांवर अजूनही पाऊस रुसलेलाच आहे.
आठवडाभरातील पावसाचे प्रमाण, वितरण, तूट याबाबत हवामानशास्त्र विभागाने रात्री उशिरा अहवाल प्रकाशित केला. त्यानुसार, “देशभरात सरासरीच्या पाच टक्के अधिक पाऊस झाला आहे. तर, राज्यात दि. 1 जून ते 25 जुलैपर्यंत सरासरी 469.0 मि.मी. पाऊस अपेक्षित असतो. तो आतापर्यंत 501.3 मि.मी. झाला आहे. तर, मध्य महाराष्ट्रातील पावसाची तूट कायम असली, तरी तिचे प्रमाण कमी झाले आहे. यात विभागात 309.1 मि.मी. पाऊस झाला आहे. साधारणपणे तो 338.4 मि.मी. अपेक्षित आहे.