काठमांडू – तब्बल 7 वर्षानंतर प्रवासी रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्याचा विचार नेपाळ करीत आहे. भारताकडून दोन रेल्वे भेट स्वरुपात मिळाल्यानंतर नेपाळने आता रेल्वेसेवा पुन्हा सुरू करण्याचा विचार केला आहे. नेपाळने भारतातून खरेदी केलेले डिझेल-इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट रेल्वे सेट काल जनकपूर शहरात दाखल झाले. त्यामुळे आता प्रवासी रेल्वेसेवा पुन्हा सुरू करण्याबाबत नेपाळचा विचार सुरू झाला आहे.
रेल्वे सेवा आवश्यक रीतीने सुरू करण्यास किमान दीड महिन्यांचा कालावधी लागेल, कारण सध्या आवश्यक मनुष्यबळाची भरती करण्याचे काम सुरू आहे, असे रेल्वे विभागातील महासंचालक बलराम मिश्रा म्हणाले. नेपाळच्या रेल्वे विभागाने 200 हून अधिक कर्मचारी भरती करण्याची योजना आखली आहे.
ही देशातील आतापर्यंतची पहिली ब्रॉडगेज प्रवासी रेल्वे सेवा असेल. नेपाळमधील जनकपूर शहरालगत असलेल्या कुर्थ्यापासून भारताच्या सीमेजवळच्या जयनगर या शहरापर्यंत सुरू होईल. पूर्वी जनकपूर-जयनगर रेल्वे सेवा सुरू होती. परंतू ती नॅरो गेज लाईनवर सुरू होती. ही रेल्वेसेवा 7 वर्षांपूर्वी थांबवण्यात आली होती.