भोपाळ – गलवान खोऱ्यातील चीन सोबत झालेल्या रक्तरंजित झटापटीबाबत राहुल गांधी यांनी केलेली वक्तव्य ही भारतीय सैन्याच्या प्रतिष्ठेचा अवमान करणारी व सैनिकांचे मनोधैर्य खचवणारी होती असा आरोप मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केला आहे.
याबाबत पत्रकारांशी संवाद साधताना चौहान यांनी, “राहुल गांधी हे भारतीय नागरिक असून देखील ते सैन्याचा अपमान करणारी, त्यांचे मनोधैर्य घटवणारी वक्तव्य करतात. त्यांचे शब्द अत्यंत दुःखद असून देशासमोर संकट उभं ठाकलं असतानाही राहुल गांधी मात्र घाणेरडं राजकारण करतात याची कीव येते.” अशा भाषेत राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र धाडले.
“राहुल गांधी यांनी चीनवर हल्ला चढवणे अपेक्षित असताना ते मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच टीका करण्यात धन्यता मानतात. एकीकडे सैनिक अस्सीम शौर्याचे प्रदर्शन करून देशाची मान गौरवाने उंचावत आहेत तर दुसरीकडे देशावर इतकी वर्ष राज्य केलेल्या पक्षाचा माजी अध्यक्ष सैनिकांचे मनोधैर्य खचवणारी वक्तव्य करतो हे निंदनीय आहे.” असा आरोपही त्यांनी केला.
डिजिटल प्रभात आता टेलेग्रामवर! जॉईन करण्यासाठी खालील लिंकरवर क्लिक करा https://t.me/edainikprabhat